Posts

Showing posts from August, 2020

पंढरपूर एस टी बससेवा ४८ तास बंद

Image
          एचपी न्यूज टीम (सोलापूर) -: वंचित बहुजन आघाडी आणि वारकरी संघटनांमार्फत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवारी पंढरपूर विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन करण्याचे योजनेमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पंढरपूर जिल्ह्यातील एस.टी. बस सेवा बंद ठेवावी, असे पत्र विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिले.            कोरोना महामारीमुळे २३ मार्च पासून बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक सेवा राज्य परिवहन महामंडळाने काही दिवसांपूर्वीच सुरु केली. अशातच राज्य शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतर बाजारपेठा, प्रवासी वाहतूक, हॉटेल्स-मॉल्स वगैरे उद्योगांना परवानगी दिली. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे उघडण्यास व भजन-कीर्तनास परवानगी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी उद्या सोमवारी ३१ तारखेला पंढरीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आणि वारकरी संघटनेतर्फे मंदीर प्रवेश आंदोलन केले जाणार आहे.            कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात महामंडळाच्या एस.टी. बसेसची तोडफोड केली जाते. त्यामुळे  उद्या होणाऱ्या आंदोलनात तोडफोडीमुळे एस.टी.बसेसचे होणारे नुकसान टाळण्या

कोकणात प्रथमच पंचतारांकित प्रकल्पाद्वारे पर्यटनाला मिळणार चालना

Image
(एचपी न्यूज-: २७ ऑगस्ट) MTDC व इंडियन हॉटेल प्रा. लि.(ताज ग्रुप) यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्याकरीता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.           महाविकास आघाडी सरकारने थोड्याच कालावधीत मागील दोन दशकांपासून पर्यटनाला चालना देण्यासाठी वाट पाहत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पंचतारांकित पर्यटन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेऊन आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व इंडियन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड (ताज ग्रुप) यांच्यात लीज डीड व सबलीज डीड असे दोन करार करण्यात आले. शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुकास्थित मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी ५४•४० हेक्टर जमीन ९० वर्षांसाठी भाडेपट्टयाने देण्याकरीता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली असून इंडियन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशातील व परदेशातील पर्यटक आकर्षित होतील तसेच यामुळे रोजगार निर्मिती

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना दैनंदिनीचे प्रकाशन

Image
शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते "शिवसेना दैनंदिनी २०२०" चे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, दैनंदिन निर्मिती प्रमुख जी.एस.परब, शरद पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते .

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना दैनंदिनीचे प्रकाशन

Image
            एचपी न्यूज-: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपादृष्टीने सन १९९३ साली शिवसेना दैनंदिनी प्रथमच प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर सलग २८ वर्षे शिवसेना दैनंदिनी प्रकाशित करण्यात येत असून, नुकतेच शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना दैनंदिनी २०२० चे प्रकाशन करण्यात आले.            शिवसेना दैनंदिनी २०२० या आवृत्तीत जीवनावश्यक उपयुक्त माहिती तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्राचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभाग प्रमुख, उप विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला संघटक आणि शिवसेनेशी संलग्न असलेल्या विविध संस्था व संघटना तसेच इतर राज्यातील शिवसेना पदाधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले असून या दैनंदिनी निर्मितीमध्ये जी. एस. परब व शरद पवार यांचे विशेष कार्य असल्याचे सांगण्यात आले.

वाहनांचे सर्व परवाने व नोंदणीकरीता मुदतवाढ

Image
एचपी न्यूज -: संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता वाहन चालक व मालकांना वाहनाचे सर्व प्रकारचे फिटनेस, परवाना व नोंदणीकरीता केंद्र शासनाकडून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  सध्या कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनाचे फिटनेस, सर्व प्रकारचे परमिट, परवाना, नोंदणी व इतर संबंधित कागदपत्रांची ३० सप्टेंबर २०२० पर्यंत असणारी वैधतेची मुदतवाढ ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केली असल्याचे जाहीर केले आहे. मंत्रालयाने अगोदर ३० मार्च व ९ जून रोजी मुदतवाढीबाबत सूचना प्रसारित केली होती. त्यात फिटनेस व सर्व प्रकारचे परवाना, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर २०२० पर्यंत असल्याचे सांगितले होते. परंतु ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिल्याने वाहन चालक व मालकांना सध्याच्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला असल्याचे वाहन चालक व मालकांकडून बोलले जात आहे.

बाजारात स्वस्त नवीन इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध

एचपी न्यूज (मुंबई-२१ ऑगस्ट २०२०) -: कोरोना महामारीमुळे देशभर मागील सहा महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आल्याने या मंदीच्या काळात स्वस्तात मस्त अशा गाड्यांची मागणी वाढली आहे. खासकरुन इलेक्ट्रिक वाहनांची मागणी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे *DETEL INDIA* ने  भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. DETEL INDIA ने यापूर्वी LED TV लाँच केला होता. त्यानंतर आता दुचाकी क्षेत्रात उडी घेत सर्वात स्वस्त आणि मस्त अशी इलेक्ट्रिक बाइक/मोपेड आणली आहे. ही मोपेड दिसायला आकर्षक असून तिची किंमत रु. १९,९९९/= +GST असेल व मोपेडने प्रवास करत असताना फक्त २० पैसे प्रति किलोमीटर खर्च येईल असा दावा कंपनीने केला आहे. या इलेक्ट्रिक मोपेड खरेदी करीता कंपनीच्या *b2badda.com* या अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिली असून ऑनलाइनने  विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच ही बाइक EMI वर घेण्यासाठी Bajaj Finserv ने चांगला प्लॅन दिला आहे. या कंपनीने Bajaj Finserv सोबत नवीन ऑफर सुद्धा आणली आहे.   Detel Easy इलेक्ट्रिक मोपेड बाजारात तीन रंगांमध्ये उपलब्ध असून यात जेट ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मॅटेलिक रेड रंग दिले

नोकरी इच्छुक बेरोजगारांना आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन

Image
  एचपी न्यूज टीम (मुंबई १९ ऑगस्ट २०२०)-: महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा मध्ये ज्या बेरोजगारांनी नोंदणी केली आहे, त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत आधार क्रमांक ऑनलाइन लिंक करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे. शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोकरीसाठी नाव नोंदणी केलेल्या बेरोजगारांना सेवा-सुविधा ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट मार्फत देण्यात येतात. राज्यात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध रोजगार मेळाव्याची माहिती मिळवून त्यासाठी प्राधान्यक्रमाने नोंद करून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण संस्थांची माहिती प्राप्त करून सहभाग घेणे. तसेच शैक्षणिक पात्रता, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल अशाप्रकारची वैयक्तिक माहिती दुरुस्ती करणे व उद्योजकांनी वेळोवेळी अधिसू

तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Image
  दोडामार्ग, दिनांक १७ ऑगस्ट २०२०-:   मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे तिलारी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावाने सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका येथील तिलारी नदीची इशारा पातळी ४१•६० मीटर असून धोका पातळी ४३•६० मीटर आहे. सध्या नदीची पातळी ४१•२० मीटर झाल्याने व हवामान विभागाने दि.२० ऑगस्ट २०२० पर्यंत अतिवृष्टीची शक्यता वर्तविल्याने आणि सध्या ११०•१० मीटर पाण्याची पातळी असलेल्या तिलारी धरणात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत होणाऱ्या वाढीमुळे तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणाऱ्या घोटगे, कुडासे, मनेरी, घोटेवाडी, कोनाळकट्टा या ठिकाणच्या गावकऱ्यांनी सतर्कता बाळगावी व संबंधित गावच्या ग्रामपंचायतींनी कच्च्या घरात व सखल ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची योग्य ती दक्षता घेऊन पाणी पातळीत वाढ झाल्यास संबंधित नागरिकांना लगेचच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. तसेच पूर परिस्थिती उद्भवल्यास तिलारी नदीच्या पुलावरुन वाहतूक होणार नाही याची काळजी घेऊन, तालुक्यातील

तहसिलदार बदलीसाठी पत्रकारांचे उपोषण

Image
  एचपी न्यूज टीम ( शहापूर १५ ऑगस्ट ) :-   शहापूरच्या तह सि लदार नि लिमा सूर्यवंशी यांच्या मनमानी कारभारा विरोधात शहापूर तालुका पत्रकारांनी काळी फीत लावून अनिश्चित काळाकरिता आजपासून साखळी उपोषण सुरू केले आहे . सध्या पसरलेल्या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात त्या अपयशी ठर ल्या असून तालुक्यातील विकास कामात खीळ घालणे, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच तालुक्यातील बहुतांश अशिक्षित सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक यामुळे लोकांमध्ये तह सि लदार नि लिमा सूर्यवंशी यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली असून त्यांच्या निष्क्रियते विरोधात व त्यांच्या बदली क री ता आज स्वातंत्र्य दिनापासून शहापूर तालुक्यातील पत्रकारांनी प्रत्येक दिवशी चार याप्रमाणे अनिश्चित काळाकरिता साखळी उपोषण सुरू केले आहे . कोरोना महामारीमुळे शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करीत दररोज चार याप्रमाणे पत्रकार साखळी उपोषणास बसतील . त्यांच्या या उपोषणास सामाजिक व सर्व राजकीय स्तरातून पूर्णपणे पाठिंबा मिळाला असून सर्वसामान्य लोकांकडून ही समर्थन मिळत असल्याचे पत्रकार प्रशांत गडगे , रविंद्र लकडे , सुनील घरत,